पुण्यातील 56 रुग्णालयांकडून अंमलबजावणी होणार, पुणे शहरातील रुबी, जहांगीर, पुना हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, सह्याद्री, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल ही सर्व हॉस्पिटल्स धर्मादाय आयुक्तालयाच्या अंतर्गत येत असल्याची मुळी कल्पनाच रुग्णांना नसल्यामुळे रुग्ण या रुग्णालयांच्या चकचकीत पणा कडे बघत घाबरत होते, मुळात ही सर्व मोठमोठी धर्मादाय रुग्णालये असुन सुद्धा या पंचतारांकित रुग्णालयांकडे अनेकदा गरीब रुग्ण घाबरुन मागे फिरतात. याच गोष्टीची जाणीव ठेऊन आमदार लक्ष्मण जगताप यांनी वेळोवेळी विधान सभेमध्ये प्रश्न उपस्थित करुन, …
अमेरिकन सासुरवाशींनी असलेल्या बस्तवडेच्या माहेरवाशीनीकडून 40 गाथा व 40 व्यासपीठे भेट... अवघ्या 41 वर्षांच्या आयुष्यात गाथा नावाचा पाचवा वेद श्रीमंत जहद्गुरू तुकाराम महाराज यांनी निर्माण केला. जीवनाच्या सर्वांगाला व्यापुन राहणारी भक्ती बरोबर समाधानी जगण्याचा राजमार्ग दाखवणाऱ्या कालातीत अश्या या 4092 अभंग असलेल्या गाथेचे पारायण बस्तवडे येथील विठ्ठल मंदिरात गेल्या वर्षी अधिक महिन्यात झाले होते.यासाठी गाथा या हमीदवाडा येथील वारकरी संप्रदायाकडून आणल्या होत्या. त्यावेळी या वाचनाचे काही व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर शेअर झाले होते.सातासमुद्…
कागल : तालुक्यातील बस्तवडे गावात रविवारी कोव्हिडं लसीकरण घेण्यात आले होते. या लसीकरणाची बातमी गावातील कुणालाच नसताना बाहेरच्या गावांत वास्तव्यास असणाऱ्यांनी ह्या लसीकरणाला हजेरी लावून लस घेतली त्यामुळे गावांतील नागरिकांच्यात कमालीचा असंतोष व नाराजी आहे. ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील लस घेताना.ह्याच लसीमुळे गदारोळात भर पडली. सदस्यांची जबाबदारी या इथे कमी पडली. प्रशासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला अँटीजन टेस्टचे टार्गेट दिले आहे. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी गावपातळीवर सर्व पदाधिकारी कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्यासाठी प्रत्येक दुकानदाराला सक्ती…
बस्तवडे गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा..! ************************ युपीएससी च्या माध्यमातून कु.हर्षवर्धन शैलेश भोसले याची एनडीए साठी निवड..! *********************** तब्बल नऊ लाख उमेदवारांमधून 350 जणांची निवड त्यात हर्षवर्धन चा समावेश.! ************************ ज्येष्ठ अवकाश संशोधक कै.राजाराम विष्णू तथा आर.व्ही.भोसले सर यांचे भाऊ म्हणजे कै. सखाराम विष्णू भोसले ,सखाराम विष्णू भोसले यांचे सुपुत्र कै.मोहन सखाराम भोसले व मोहन भोसले यांचे चिरंजीव श्री.शैलेश मोहन भोसले व हर्षवर्धन हा श्री.शैलेश काकांचा चिरंजीव. शालेय जीवनापासू…
याच साठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा...." आजची ही पोस्ट लिहिण्याचे कारण असे की,"चांगल्या व्यक्तीमधील चांगुलपणाचा प्रसार व्हावा आणि समाजातील अधिकाधिक लोक चांगुलपणाने वागावेत , यासाठी आपल्याला जे जे चांगले वाटते ते निःसंकोचपणे मांडावे!" असे आमचे मार्गदर्शक व पत्रकार आदरणीय मधुकरदादा नेहमी सांगतात . माझी मुलगी वैष्णवी हिची जिवलग मैत्रीण अस्मिताच्या आजोबांचे 26 जानेवारी रोजी निधन झाले. वैष्णवी आमच्या घरी कमी पण अस्मिताच्या घरी अधिक असते असे म्हटले तर वावगे होणार नाही. अस्मिताने आपल्या आजोबांना कधी चाललेले पाह…
आपल्या गावातील श्रीमती विमल शिवाजी पाटील यांचे आज सकाळी 10 वाजता दुःखद निधन झाले आहे.... त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो...! भावपूर्ण श्रद्धांजली !
आपल्या गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक व माजी सैनिक श्री.आनंदा ज्ञानू जगदाळे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले.त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
जीव धोक्यात घालून कोरोना काळात सेवा करणाऱ्या हातांना ध्वजारोहन व ध्वजपूजनाचा मान..! ज्या वेळी आपण सारे कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी संपर्क टाळून घरी होतो त्याचवेळी अगदी 38 तापमान असताना देखील या दोघी मात्र दारोदारी जाऊन सर्व्हे व अन्य काम नेकीने करीत होत्या.त्यांच्याच या समर्पित सेवेला वंदन करण्यासाठी म्हणून कर्मवीर डी. आर.भोसले विद्या मंदिर बस्तवडे चे ध्वजारोहण व ध्वजपूजनाचा मान आपल्या गावातील सौ.सुनीता उत्तम कांबळे व सौ.आशा संजय वांगळे या आशा स्वयंसेविकाना देण्याचा निर्णय शालेय व्यवस्थापन समितीने घेतला आहे.
बस्तवडे गावातील भजनी परंपरेचे अध्वर्यू व एक अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेले धोंडीराम वाळेकर मामा हे 5 सप्टेंबर 2015 रोजी गोकुळ अष्टमी दिवशी अगदी अचानकपणे गेले.अगदी तसेच आदरणीय अनुसया वाळेकर मामी देखील आज मार्गशीर्ष द्वादशीला अचानक गेल्या. आदरणीय मामा यांच्या भजन सेवेतील 61 वर्षे पूर्ण झालेबद्दल नोव्हेंबर 2013 मध्ये त्यांचा व मामींचा सत्कार विठ्ठल मंदिराच्या वतीने दलीतमित्र एस.आर.बाईत सर,प्रसिद्ध प्रवचनकार अशोक कौलवकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला होता. या आदर्श दाम्पत्याच्या पवित्र स्मृतींना वंदन.! शब्दांकन मधुकर भोसले
स्व. राजाराम विष्णू जगदाळे दिनांक १५ जून २०२० रोजी पहाटे अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे मृत्यू झाला. आमचे चुलते कै. राजाराम विष्णू जगदाळे यांचे आज पहाटे ४ वाजता देहावसान झाले. त्यांच्या मागे मुलगा , मुलगी , जावई , नात आणि पत्नी असा परिवार आहे. अल्पशा आजाराने त्यांनी एपल सरस्वती हॉस्पिटलमध्ये आपली जीवन यात्रा स्थगित केली. रक्षा विसर्जन उद्या दिनांक 16 जून मंगळवारी सकाळी 9 वाजता आहे. 9 नंबरच्या शेड मध्ये , कोल्हापूर पंचगंगा घाट , कोल्हापूर येथे. दिवस कार्य दिनांक २६जुन २०२० रोजी बालाजी पार्क,कोल्…
बस्तवडे : येथे आज नवंनिर्वाचित प्रशासक श्री आर. व्ही. कांबळे यांचे स्वागत सदासाखर सह कारखानाचे संचालक श्री बापूसाहेब भोसले, सिद्धीनेर्लीचे श्री शहाजी पाटील यांनी आज केले. या प्रसंगी पत्रकार अमरसिंह राजे, मावळते सरपंच अप्पासो माळी, किरण पाटील, सातप्पा कांबळे, एन. व्ही. कांबळे, संतोष पाटील, विष्णू वांगळे, कोतवाल शरद नरके, पोलीस पाटील धनाजी वायदंडे, प्रमोद पाटील, सुरेश माळी इत्यादी उपस्थितीत होते.
गावचे सुपुत्र श्री प्रकाश बळीराम पाटील कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग महाराष्ट्र शासन हे आज दिनांक ३१/७/२०२० रोजी सेवानिवृत्त झाले. बस्तवडे ग्रामस्थांच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य लाभो !
हार्दिक अभिनंदन ! आमचे ओंकार युवराज जगदाळे हा SSC बोर्डाच्या परीक्षेत 82.40%मार्क्स मिळवुन उत्तीर्ण झाला त्याबद्दल त्याचे व मुरगुड विद्यालय मुरगुडच्या सर्व शिक्षक स्टाफ व मुख्याध्यापक यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा ! त्याला श्री. विजय पाटील सर, J. D. पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले !
स्व.सौ. सुनंदा रामचंद्र जगदाळे यांचे हृदय आघाताने रात्रौ 12 च्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, सुना, नातवंडं आहेत. रक्षा विसर्जन उद्या सकाळी 9 वाजता आहे.
अत्यन्त दुःखद घटना आपल्या गावातील कै.सुभाष मारूती माळी यांची कन्या व आनंदा माळी यांची पुतणी कु. नम्रता सुभाष माळी (वय 23) हिचे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने रात्री दु:खद निधन झाले. या अत्यन्त धक्कादायक घटनेने संपूर्ण गाव हादरले आहे. ईश्वर तीच्या आत्म्यास चिरशांती देवो, ही प्रार्थना. त्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत तसेच या खूप कठीण काळातून सावरण्याची शक्ती देवाने या परिवारास द्यावी हीच ईश्वरचरणी विनंती !
दिनांक ५ एप्रिल २०२० आज रोजी गावातील ज्येष्ठ वारकरी श्रीमती शांताबाई गोविंद जगदाळे यांचे आज राहत्या घरी देहावसान झाले. त्यांचे मागे मुले, सुना, लेक, नातवंड आहेत.
कधी कधी प्रवास मुळाकडे पण जाणारा असतो..! 1965 मध्ये आदर्श समाज शिक्षक हभप बळवंत भैरू लवाटे गुरुजी यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली बस्तवडे ता कागल येथे श्री विठ्ठल मंदिराची स्थापना झाली व त्याच वर्षी पहिला हरिनाम सप्ताह संपन्न झाला..तिथून 2019 पर्यंत सलग 55 वर्षे हा नामसप्ताह अखंड पणे होत आला मात्र यंदा कोरोना या जागतिक विषाणू मुळे हा सप्ताह दीप वगळता रद्द करावा लागला. 1965 पासून गावात बऱ्यापैकी विठ्ठल मंदिरात भजन कीर्तन सुरू झाले मात्र तत्पूर्वी गावात भजन परंपरेची सक्षमपणे सुरुवात झाली ती चिखलकर मास्तरांच्या घरी..! त्या दरम्यान च…
Social Plugin